शंभू चरित्र भाग २१

शंभू चरित्र भाग २१

छत्रपती दक्षिण मोहिमेला गेल्यानंतर अष्टप्रधानांची कारस्थाने सुरू झाली.इकडे शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजीराजेंतील कवी,लेखक जागा झाला. बुधभूषणम् हा संस्कृत तर नायिकाभेद,नखशिख आणि सातसतक हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ त्यांनी याच कालावधीत लिहिले.यावेळी त्यांना कवी कलश यांची चांगली साथ लाभली.शृंगारपूर परिसरात दुष्काळ पडल्यामुळे,रयतेकडून एक वर्ष करवसुली न करण्याचा संभाजीराजेंनी निर्णय घेतला.पण अष्टप्रधानानीं संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास नकार दिला.संभाजीराजे राज्य चालविण्यासाठी अयोग्य आहेत,असा प्रचार अष्टप्रधान मंडळीनी आरंभिला.तशी पत्रे त्यांनी कर्नाटकात मोहिमेवर असलेल्या छत्रपतींना पाठविली. आपल्या निर्णयाला स्वराज्यात किंमत नाही,असे समजल्यामुळे संभाजीराजे निराश झाले.अशातच दिलेरखानाने संभाजीराजेंना पत्र पाठवून आपल्याकडे येण्याचा निरोप दिला.मुघलांना मिळून त्यांची गुपीते मिळवावी असा विचार करून त्यांनी मुघलांना सामील व्हायचा निर्णय घेतला.सभासदाच्या बखरीमध्ये याचे पुढीलप्रमाणे वर्णन आहे.'इतकियात संभाजीराजे राजियाचे पुत्र ज्येष्ठ राजियावर रूसून मोघलाईत गेले .' दिलेरखानाने संभाजीराजेंना ढाल करून भूपाळगडावर हल्ला
केला.शत्रूपक्षात संभाजीराजे असल्यामुळे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा तसेच इतर मावळ्यांनी शरणागती पत्करली.संभाजीराजेंनी सर्व सैनिकांना सुखरूप जाऊ मागणी दिलेर खानाकडे केली.पण दिलेर खानाने सर्वच सैनिकांचा एक हात कलम करण्याचा आदेश दिला,तसेच त्याने आदिलशाहच्या ताब्यातील अथणीवर हल्ला करून तेथील जनतेचा अनन्वित छळ केला.मोघलांना सामील होऊन आपण चूक केल्याचे संभाजीराजेंना कळल्यामुळे मोघलांच्या तावडीतून निसटून ते विजापूर मार्गे पन्हाळा किल्ल्यावर येऊन दाखल झाले.
---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

शिवदिनविशेष 13/03

शिवदिनविशेष 10/03